सरांच्या वास्तु व्हिजीटपूर्वी आमची परिस्थिती खूपच खराब होती. गेल्या १० वर्षांपासून आम्ही अडचणीत होतो आणि २००५ पासून न्यायालयीन खटले चालू होते. आमचे कोणतेही काम सुरळीत पार पडत नव्हते. एक दिवस मी मकरंद सरांचा साम टि.व्ही. वरील महाराष्ट्र कॉलिंग कार्यक्रम पाहिला व आम्हाला खूपच आवडला आणि त्याच दिवशी आम्ही सरांची वास्तु व्हिजिट साठी नाव नोंदणी करण्याचे
ठरवले.
जेव्हा सर आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत फारच आवडली, आमच्या वास्तुमधील दोष, समस्या अगदी चांगल्या प्रकारे समजून घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व कामे हळूहळू मार्गी लागली, आमचे १० वर्षांपासूनचे कर्ज फ़िटत गेले, कोर्टाचे प्रकरण कायमचे बंद झाले आणि ते फ़क्त मकरंद सरांमुळे. आम्हाला अजुनही सर खुप छान मार्गदर्शन करतात, तुमचे आशिर्वाद आमच्यावर कायम असच राहुदे.